Posts

Showing posts from September, 2019

मानस

Image
कोणताही माणूस नास्तिक नसतो. निसर्ग, वैश्विक शक्ती, ऊर्जा, स्वतः कशावर तरी त्याची श्रद्धा असते, विश्वास असतो. या विश्वासाच्या बळावरच तो त्याचा परिपूर्णतेकडचा मार्ग आक्रमित असतो.  बघितलंयस फुलपाखरू कसं फुलावर डोलतं  माझं मनही असंच नेहमी तुझ्या विचारात सुखावतं      काट्यातून, हिरवळीतून, मखमलीतूनही परतून  तुझ्याच कुशीत हळुवार शांतपणे विसावतं     मनाचा विरंगुळा तू  तू प्रसन्नतेचे आगर  शांतीचा ठेवा तू  तू स्वप्नांचा सागर      तूच इच्छाशक्तीचा स्रोत  तू आशेची लावलवणारी ज्योत  मनाच्या मिटणाऱ्या पाकळ्या फुलविणारा  तूच वाऱ्याचा सुंदर झोत      उंचावून स्वतःला क्षितिज विस्तारणंही  तुझंच अस्तित्व शिकवितं  माझं मनही असंच नेहमी  तुझ्या विचारात सुखावतं      पौर्णिमा ढेरे 

भाषा

Image
Image Credit : Google Images   माणसाच्या उत्क्रांतीमधला महत्वपूर्ण घटक संवाद व ओघानेच भाषेची निर्मिती समजला जातो. एकमेकांशी वैचारिक देवाणघेवाण करण्याची क्षमता असल्यानेच मनुष्यप्राणी इतर प्राण्यांपासून वेगळा व उजवा ठरतो.    भाषेची उत्पत्ती होण्याआधी मानवाने सांकेतिक भाषा, खाणाखुणांचा वापर केला असेल. सध्या आपण मूकाभिनयाने गोष्टी ओळखण्याचा खेळ खेळतो तेव्व्हा साध्या सोप्या भावना पोहोचवताना उडणारी तारांबळ करमणुकीचा भाग ठरते. प्रत्यक्षात भाषा नसताना सांकेतिक भाषेच्या मर्यादा माणसांना हाताशही करत असतील.    कालापरत्वे नवनवीन शब्द त्यांचे अर्थ यांची निर्मिती, सांगड घालण्याची क्रिया वेगळाच आनंद मिळवून देत असेल किव्वा त्यातून कदाचित वादही निर्माण होत असतील.    आज आपण जगभरात अनेक प्रगत भाषा वापरतो. विविध भाषांवर प्रभुत्व असणारे अनेक लेखक, कवी इत्यादींनी भाषांना वेगवेगळे अलंकार देऊन सजविले, नटविले, घडविले. दोन माणसातला संवाद समाजाभिमुख झाला. भाषेची व माणसांची पोहोच वाढली. आपल्यातल्या अवलियांनी यंत्रांनाही समजणाऱ्या भाषा बनविल्या.    ...

सहज

Image
किती सुंदर आहे हा शब्द ...सहज ! उगाच म्हणून मित्राला मारलेली हाक, कामाशिवायची रपेट, किव्वा वेळ आहे म्हणून केलेली खरेदी, जास्त सुखावून जातात  नाही का?   एरवी हा जीवनरगाडा असा नेहमीच कार्यकारणभाव ओळखून चाललेला असतो. आजच्या कॉर्पोरेट जगात, दैनंदिन व्यवहारात संभाषणदेखील मोकळेपणाचे नसते. त्यामागेदेखील काहीतरी उददेश असतो. त्यामुळे बसस्टॉपवरील अनोळखी व्यक्तीबरोबर बेस्टवर टाकलेला विनोद किव्वा मुलांबद्दल व्यक्त केलेली काळजी व्यक्तीला हात उंचावून टाटा करण्याइतकी जवळीक निर्माण करून जातात.    यातून social media वर लोकांचं रमणं साहजिक असल्याचं  अधोरेखित होतं. कित्येकदा आपली दुःख सोडाचं आपल्या प्रगतीबद्दलही आपण कुणालाच बोलू शकत नाही. मग तीच बाब tweet करून अथवा पोस्ट share करून त्यावरील thumbs काउन्ट करून आपण आपल्या पाठीवर पडलेल्या कौतुकाची थाप अनुभवतो.    आपल्याबाबत थोडकीसुद्धा माहिती नसताना योग्य वेळी वाचनात आलेल्या inspirational  thought चा sender philosopher  किव्वा guide बनून जातो.    आयुष्य हवेवर उडणाऱ्या शेवरी...